Skip to main content

भगवान श्री कृष्ण चरित्र - मी अनुभवलेल, माझ्या नजरेतून..

 भगवान श्री कृष्ण चरित्र - मी अनुभवलेल, माझ्या नजरेतून..





कृष्ण ज्याचं नाव गोकुळ ज्याचं धाम अशा श्री भगवान कृष्णाला माझा शतशः प्रणाम.🙏🙏



लहानपणा पासून आपल्या सर्वांना कृष्णाचं आकर्षण आहे, असा कोणी नसेल या भारतात ज्याला कृष्णाचा मोह नाही.


श्री कृष्णासारखा सर्वगुणसंपन्न अद्वितीय पुरुष हिंदुस्थानातच काय पण कोणत्याही देशात आज पर्यंत झाला नाही. अलौकिक पराक्रम, अप्रतिम बुद्धिमत्ता असामान्य नेतृत्वगुण, सर्व सदगुणांनी श्रीकृष्ण सर्व ऐतिहासिक किंबहुना काल्पनिक व्यक्तींच्याही शिरस्थानीं आहेत.


श्रीकृष्णानें आपल्या भागवत गीतेतील उपदेशने सर्व भारतीय लोकांच्या हृदयांवर असा कायमचा ठसा उमटवला आहे की, तो पुसटून टाकणें शक्य नाहीं. श्रीकृष्णाच्या चरित्राने व उपदेशानें भारतीय इतिहासात जे आपल्याला मिळालं आहे, ते इतर कोणाकडून मिळणे कठीण आहे. ज्यांच्या कानांत भगवद्गीतेच्या श्लोकांचा ज्ञानरस पडला आहे, त्यांस अन्य विचार/वाईट प्रवृत्तींचा ध्वनि मधुर लागणें शक्य नाही.


श्रीकृष्णाचं चरित्र अनेक दृष्टींनी अत्यंत मनोहर व उपयुक्त आहे. ते व्यवहार्यास शहाणपण शिकविणारे आहे,जो विपन्नावस्थेत आहे त्याला धैर्य देणारे आहे, ज्याच्या मध्ये निरुत्साह आहे त्याच्या मध्ये उत्साह उत्पन्न करणारे आहे, मनामध्ये संशय असेल तर निश्वयाच्या पायरीवर नेऊन पोचविणारे आहे, सामान्य जनास प्रेम उत्पन्न करणारे, श्रीमंतास उन्मत्तपणापासून वाचविणारे, गरिबास आधार देणारे, दुष्टास भय उत्पन्न करणारे, व सुष्टास नीतिमत्तेचा रस्ता दाखविणारे चरित्र आहे.



"तुम्हाला जे काही करायचे  आहे ते करा, परंतु लोभाने नाही, अहंकाराने नाही. वासनेने नाही, मत्सराने नाही तर प्रेम, करुणा, नम्रता आणि भक्तीने."    मला श्री कृष्णाच हा विचार खुप भावला , सध्या बघितलं तर ह्या कलियुगात मनुष्यामध्ये खुप लोभ , अहंकार, दुसर्यांच्या मत्सर करणे ह्या भावना बळावल्या आहेत.

आपण सर्वांनी नितीमत्तेने सर्वांना सोबत घेऊन राहिल पाहिजे, आपला धर्म पाळला पाहिजे, चांगले कर्म केले पाहिजे हेच तर श्री भगवान कृष्णाने सांगितले आहे.


     पुढचा भाग-2 लवकरच.....

पुढील भागासाठी कमेंट करा.....

Comments

Popular posts from this blog

वेळेसाठी काळाला जिंकतोय मी...

वेळेसाठी काळाला जिंकतोय मी...                                                 काळ तर आला आहे, वेळ चुकवून चालणार नाही. 'काळ - वेळ'  आणि  प्रभावी कोण मी का? माझं रिकामं हात मला माझा काळ दाखवत,  'मन-गट' त्याची ताकद दाखवुन द्यायची आहे, पण मन हे सांगायला विसरत नाही "दाखवतो कुणाला आणि का"  हात आणि मनगट दोन्ही जवळ.... "मनगटातील ताकद आणि हाताची लखीर कोणी हिरावून घेऊ शकत नाही",   स्वप्नातला रस्ता, त्या रस्त्यावर चालताना दुर डोंगररांगामधुन येणार तो सुर्य, त्याचा तो प्रकाश ---- आम्ही राजा हरिश्चंद्राचे कर्म केले तरी स्वप्न विकत मिळत असलेल्या बाजारातील रस्त्यावर चालत असताना सुर्य मात्र डोक्यावर आग ओकत होता ----- मागच्या मुसळधार पावसामुळे त्वचेला पाण्याची सवय होउन गेली, तेव्हाच डोक्यात गेलेल्या हवेमुळे कातड्याला या वादळ-वाऱ्याचा विट आला ---- रोज एक नवा पाहुणा --- असो --- सांगायच होत काय तर या डोक्यावरच्या तळपत्या ज्वाळांनी ह्या काताड्याना आगीची स...

FRIENDS OUR LIFELINE

FRIENDS OUR LIFELINE     LKG ला बुटाची लेस बांधायला शिकवल्या पासून ते अगदी आतापर्यंतच्या आणि पुढील आयुष्याच्या पुस्तकाचा धडा जगण्या पर्यंत मी ONKAR KHAMGAL नाव सांगु शकतो ते केवळ मित्रांनो तुमच्या मुळे.                         काही मित्र संकटात उभे राहिले, काहींनी संकटे येवून दिली नाहीत, काही तर माझा वर आलेल्या संकटांना स्वतः ONKAR KHAMGAL म्हणून सामोरे गेले सुद्धा.                            नियतीने माझ्या आयुष्यात टाकलेल्या चक्रव्यूहात काही माझ्या ONKAR KHAMGAL या नावासाठी लढले, जगले तर काही उपाशी सुद्धा राहीले.       तुम्ही जेव्हा तुमचा मित्रता धर्म पाळता तेव्हा मला नेहमी कृष्ण आणि कर्णा ची आठवण आल्याशिवाय राहत नाही .       मी आयुष्याच्या धावपट्टीवर सुसाट वेगाने पुढे जात आहे ह्यामध्ये कुटुंबीय, नातेवाईक, शिक्षक ह्या सोबत तुम्हा मित्रांचा सहारा आहे, होता व राहील हीच अपेक्षा.  मित्र #friends FRIENDS OUR LIFELIN...

जीवनाचा आनंद घ्या - - - Why to wait for a DEATH…

  जीवनाचा आनंद घ्या   - - - Why to wait for a DEATH… आनंद हा विकत मिळत नाही , आनंद हा स्वभावात असायला हवा .   आपण नेहमी बघतो की मनुष्य हा आनंदी नसतो , किंवा काही गोष्टी त्याचा आनंद हिरावून घेतात- जस की भूतकाळातील प्रसंग , वर्तमानातील चालू घडामोडी , किंवा भविष्याची चिंता. मला एक जाणवलं की मनुष्य आनंदी राहण्याचा प्रयत्न कधीच करत नाही काही अपवाद वगळता.. किंवा त्याला ज्या गोष्टी आनंदी ठेवतात तो त्याचा पाठलाग करतो ह्यासाठी की त्या गोष्टी त्याला मिळाल्या पाहिजेत , पण ज्यावेळेस तो भविष्यामध्ये आनंदी , सुखी राहण्याचा प्रयास करतो तो वर्तमानातल्या क्षणाला मुकतो.. आपला आयुष्य जे आपण जगतो , जगलेलो असतो ते एक आपलं वर्तमानच नाही का.  जर आपल्याला आनंदी/ सुखी  राह्यचं असेल तर आपण वर्तमानकाळात आनंदी राहायचा प्रयत्न केला पाहिजे जरी परिस्थिती कशीही असली तरी. आनंद हा जीवनभरासाठी हवा असेल तर ,  इतरांना हि आनंदी करा .   जो आनंद/आधार  इतरांना देतो तो एक दिवस परत आपल्याकडे येतो असा भागवतगीते मध्ये श्री कृष्णाने सांगितलं आहे . जीवन हे एक सुंदर अनुभव आहे - ते आपल्...