Skip to main content

जीवनाचा आनंद घ्या - - - Why to wait for a DEATH…

 जीवनाचा आनंद घ्या  - - - Why to wait for a DEATH…


आनंद हा विकत मिळत नाही, आनंद हा स्वभावात असायला हवा. 


आपण नेहमी बघतो की मनुष्य हा आनंदी नसतो, किंवा काही गोष्टी त्याचा आनंद हिरावून घेतात- जस की भूतकाळातील प्रसंग, वर्तमानातील चालू घडामोडी, किंवा भविष्याची चिंता.

मला एक जाणवलं की मनुष्य आनंदी राहण्याचा प्रयत्न कधीच करत नाही काही अपवाद वगळता.. किंवा त्याला ज्या गोष्टी आनंदी ठेवतात तो त्याचा पाठलाग करतो ह्यासाठी की त्या गोष्टी त्याला मिळाल्या पाहिजेत, पण ज्यावेळेस तो भविष्यामध्ये आनंदी , सुखी राहण्याचा प्रयास करतो तो वर्तमानातल्या क्षणाला मुकतो.. आपला आयुष्य जे आपण जगतो , जगलेलो असतो ते एक आपलं वर्तमानच नाही का.

 जर आपल्याला आनंदी/ सुखी  राह्यचं असेल तर आपण वर्तमानकाळात आनंदी राहायचा प्रयत्न केला पाहिजे जरी परिस्थिती कशीही असली तरी.

आनंद हा जीवनभरासाठी हवा असेल तरइतरांना हि आनंदी करा. 

जो आनंद/आधार  इतरांना देतो तो एक दिवस परत आपल्याकडे येतो असा भागवतगीते मध्ये श्री कृष्णाने सांगितलं आहे.

जीवन हे एक सुंदर अनुभव आहे - ते आपल्याला नेहमी देत असत , जीवनातील प्रत्येक क्षणांचा आनंद घेतला पाहिजे,

सध्या लोकांच्या अपेक्षा असतात की समोरील व्यक्तीने आपल्या मनासारखं वागावे, आणि तो व्यक्ती तास वागला नाही तर आपल्याला राग येतो, अपेक्षा ला अंतः नाही, जर प्रेत्यकाने स्वतःला आनंदी ठेवले तर  प्रेत्येक जण आनंदी होईल..

काहीजण कोठेही बँड वाजताना दिसला की, लगेच त्या ठिकाणी जाऊन इतरांसोबत नाचायला लागतात. त्यांना काहीही फरक पडत नाही. कोणाचं लग्न आहे की लोक काय म्हणतील. त्यांना फक्त नाचण्याचा आनंद घ्यायचा असतो. ते सर्वांसोबत दिलखुलास  नाचतात आणि नाचल्यानंतर प्रसन्न होऊन निघूनही जातात. अशी लोकं प्रत्येक ठिकाणी व प्रत्येक क्षणी आनंद शोधतात. ज्या ठिकाणी आनंद मिळेल त्या ठिकाणी जावून इतरांशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात - त्यांचाही आयुष्यात दुःख असतात पण त्यांनी ती कला मिळवली असते  की दुःख बाजूला सारून आनंद शोधायचा कसा..

मला एक वाटतं आनंदाने जगायचे असेल, तर दोनच गोष्टी विसरा..  तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते, आणि इतरांनी तुमच्याशी जे वाईट केले ते.. कारण आपली विचार प्रक्रिया असते ते बहुतांशी मुख्य भूमिका बजावते..

 

सुखदु:खाच्या लंपडावातच..

जीवनाचा खराखुरा आनंद आहे… 


Part 2- soon 





Comments

Popular posts from this blog

वेळेसाठी काळाला जिंकतोय मी...

वेळेसाठी काळाला जिंकतोय मी...                                                 काळ तर आला आहे, वेळ चुकवून चालणार नाही. 'काळ - वेळ'  आणि  प्रभावी कोण मी का? माझं रिकामं हात मला माझा काळ दाखवत,  'मन-गट' त्याची ताकद दाखवुन द्यायची आहे, पण मन हे सांगायला विसरत नाही "दाखवतो कुणाला आणि का"  हात आणि मनगट दोन्ही जवळ.... "मनगटातील ताकद आणि हाताची लखीर कोणी हिरावून घेऊ शकत नाही",   स्वप्नातला रस्ता, त्या रस्त्यावर चालताना दुर डोंगररांगामधुन येणार तो सुर्य, त्याचा तो प्रकाश ---- आम्ही राजा हरिश्चंद्राचे कर्म केले तरी स्वप्न विकत मिळत असलेल्या बाजारातील रस्त्यावर चालत असताना सुर्य मात्र डोक्यावर आग ओकत होता ----- मागच्या मुसळधार पावसामुळे त्वचेला पाण्याची सवय होउन गेली, तेव्हाच डोक्यात गेलेल्या हवेमुळे कातड्याला या वादळ-वाऱ्याचा विट आला ---- रोज एक नवा पाहुणा --- असो --- सांगायच होत काय तर या डोक्यावरच्या तळपत्या ज्वाळांनी ह्या काताड्याना आगीची स...

Challenges faced by Civil Engineering Students....

Civil Engineering is a challenging field of study , requiring students to be both academically strong and practical in their approach. While pursuing a degree in Civil Engineering, students face various challenges that can affect their academic performance and personal life.  In this blog, we'll take a look at some of the most common challenges faced by Civil Engineering students and suggest some solutions to overcome them. 1. Balancing academics and practical work: Civil Engineering students are required to attend lectures, complete assignments, and participate in practical work simultaneously. Balancing all these activities can be overwhelming, leading to stress and burnout. To overcome this, students can prioritize their tasks and allocate time effectively to ensure that they are meeting all their academic and practical requirements. 2. Staying up-to-date with advancements in the field: Civil Engineering is a rapidly evolving field, and students must stay updated with the latest...

भगवान श्री कृष्ण चरित्र - मी अनुभवलेल, माझ्या नजरेतून..

 भगवान श्री कृष्ण चरित्र - मी अनुभवलेल, माझ्या नजरेतून.. कृष्ण ज्याचं नाव गोकुळ ज्याचं धाम अशा श्री भगवान कृष्णाला माझा शतशः प्रणाम . 🙏🙏 लहानपणा पासून आपल्या सर्वांना कृष्णाचं आकर्षण आहे, असा कोणी नसेल या भारतात ज्याला कृष्णाचा मोह नाही. श्री कृष्णासारखा सर्वगुणसंपन्न अद्वितीय पुरुष हिंदुस्थानातच काय पण कोणत्याही देशात आज पर्यंत झाला नाही. अलौकिक पराक्रम, अप्रतिम बुद्धिमत्ता असामान्य नेतृत्वगुण, सर्व सदगुणांनी श्रीकृष्ण सर्व ऐतिहासिक किंबहुना काल्पनिक व्यक्तींच्याही शिरस्थानीं आहेत. श्रीकृष्णानें आपल्या भागवत गीतेतील उपदेशने सर्व भारतीय लोकांच्या हृदयांवर असा कायमचा ठसा उमटवला आहे की, तो पुसटून टाकणें शक्य नाहीं. श्रीकृष्णाच्या चरित्राने व उपदेशानें भारतीय इतिहासात जे आपल्याला मिळालं आहे, ते इतर कोणाकडून मिळणे कठीण आहे. ज्यांच्या कानांत भगवद्गीतेच्या श्लोकांचा ज्ञानरस पडला आहे, त्यांस अन्य विचार/वाईट प्रवृत्तींचा ध्वनि मधुर लागणें शक्य नाही . श्रीकृष्णाचं चरित्र अनेक दृष्टींनी अत्यंत मनोहर व उपयुक्त आहे. ते व्यवहार्यास शहाणपण शिकविणारे आहे,जो विपन्नावस्थेत आहे त्याला धैर्य दे...